राज्यात विविध ठिकाणी NDRFची बचाव मोहिम; ५२ मृतदेह काढले बाहेर!

साताऱ्यातील आंबेघर दुर्घटनेतील ११ मृतदेह हाती
NDRF
NDRFANI

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापूरात मोठी वित्त आणि जीवितहानी झाली आहे. ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडींमध्ये अनेक घरं भूईसपाट झाली आहेत. तर अनेकजणांचा या ढिगाऱ्यांखाली अडकल्याने मृत्यू झाले आहेत. दरम्यान, NDRFकडून युद्धपातळीवर बचाव मोहिम राबवण्यात येत असून आत्तापर्यंत ५२ मृतदेह बाहेर काढले आहेत. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (NDRF recovered 52 bodies from various places in Maharashtra aau85)

NDRFच्या टीमनं राज्यातील दरड कोसळलेल्या विविध ठिकाणांहून ५२ मृतदेह बाहेर काढले आहेत. NDRFकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम राबवण्यात येत असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. NDRFनं आपल्या निवेदनात ही माहिती दिली.

NDRF नं म्हटलं की, महाराष्ट्रात आम्ही काल बचाव मोहिम सुरु केली. यामध्ये आत्तापर्यंत आम्हाला सात ते आठ वर्षे वयोगटातील दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. सखल भागांमध्ये अद्यापही चिखलांनी भरलेले आहेत. बचावकार्यासाठी हा चिखल काढून मार्ग तयार केला जात आहे. यामुळे शोधमोहिमेला मदत होईल, असं NDRFचे उपनिरिक्षक संजीवकुमार यांनी रायगड येथील दरड कोसळलेल्या भागांतील परिस्थितीची माहिती दिली.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील आंबेघर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. यांपैकी ११ जणांचे मृतदेह NDRFच्या हाती आले आहेत. अद्यापही याठिकाणी बचाव मोहिम सुरुच असल्याचं सातारा जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com