जीवघेणा ठरतोय नऊ जिल्ह्यांचा प्रवास

Accident
Accident

पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश
सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती व नगर या जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ठरतोय. या जिल्ह्यांच्या मार्गांवर दरमहा १५० हून अधिक अपघात होतात, तर ७० हून अधिक जणांचा मृत्यू होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार अपघात होऊन त्यात १३ हजार ४०० जणांचा मृत्यू होत असल्याचे चित्र मागील तीन वर्षांपासून कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी बैठक घेऊन जानेवारी ते मे २०१९ या कालावधीत ठरावीक जिल्ह्यांना अपघात व मृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, अपघात कमी होणे तर सोडाच, त्यात दीडपटीने वाढ झाल्याचे समोर आले. त्यात पुणे, नाशिक आघाडीवर आहेत.

दंडात्मक कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी मोबाईल टॉकिंग, अतिवेग, मद्यपान, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे परवाने ९० दिवसांसाठी रद्द करण्याकरिता आरटीओकडे पाठवायला हवेत. मात्र, बहुतेकवेळा वाहतूक पोलिस जागेवरच दंड घेऊन सोडून देतात. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com