विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार, राऊतांच्या ट्विटनंतर नितेश राणेंचे ट्विट

 Nitesh Rane News
Nitesh Rane Newsesakal

महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे. शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. अशातच संजय राऊत यांनी ट्विट करत मविआ सरकार बरखास्त होणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, नितेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?

संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी?

चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार ! असे म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालपासूनच राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राऊत यांनी "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.." असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत? दिले. त्यामुळे राज्यात नवं सरकार लवकरच स्थापन होणार असल्याचा तर्क राजकीय वर्तुळा लावण्यात येत आहे.

विधानसभा बरखास्तीची दोन कारणं आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, किंवा सत्ताधारी पक्षावर अविश्वासाचा ठराव आणवा आणि सत्ताधारी तो अविश्वासाचा ठराव जिंकू शकले नाही, तर विधानसभा बरखास्त होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com