अनुदानाचे साडेसहा हजार मिळेनात; कर्जमाफी ठप्पच

अनुदानाचे साडेसहा हजार मिळेनात; कर्जमाफी ठप्पच

सोलापूर : दुष्काळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर असतानाच राज्यातील शेतकऱ्यांचे दूध, कांदा व तूर-हरभरा आणि दुष्काळ अनुदानाचे एकूण सहा हजार 522 कोटी रुपये सरकारकडून अद्यापही मिळालेले नाहीत. कर्जमाफी ठप्प असल्याने शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्जही मिळणे बंद झाल्याचे चित्र आहे. परंतु, शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्धवट व चुकीच्या माहितीमुळेच हे अनुदान रखडल्याचे संबंधित यंत्रणांकडून सांगण्यात आले. 

राज्यातील 82 लाख शेतकरी दुष्काळाने बाधित झाले असून तरीही त्यापैकी तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मिळालेले नाही. 2019 मध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील 107 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही सरकारकडून निकष लावून दुष्काळ अनुदान दिले जात आहे. राज्यातील 30 हजार शेतकऱ्यांना तूर-हरभरा तर 20 हजारांहून अधिक दुग्ध व्यवसायिकांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. सात-बारा उताऱ्यावर पीकपेऱ्याची नोंद नसल्याने सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांरी अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. 

दीड लाखापर्यंत थकबाकी असलेले व नियमित कर्जदार असलेल्या सुमारे 13 हजार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. अशा शेतकऱ्यांची बॅंक खाती थकबाकीत गेल्याने त्यांना नव्याने कर्जवाटप करण्यात आले नाही. 

- के. आर. पाटील, सहायक व्यवस्थापक, सोलापूर जिल्हा बॅंक 
 

दुष्काळाने राज्यातील 82 शेतकरी बाधित झाले असून त्यांना आता दुष्काळ अनुदानाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. आतापर्यंत 30 लाख 80 हजार शेतकऱ्यांना एक हजार 38 कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. 

- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन विभाग 
 

रखडलेले अनुदान - 

दूध 
293.28 कोटी 

तूर-हरभरा 
50.73 कोटी 

दुष्काळ निधी 
6,000 कोटी 

कांदा 
178.27 कोटी 

कर्जमाफी 
11,000 कोटी (आकडे रुपयांत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com