'मोदी साहेब, चौक कोणता ते सांगा?'

'मोदी साहेब, चौक कोणता ते सांगा?'

मुंबई- "देशात नोटाबंदी करून दोन वर्षे म्हणजे 730 दिवस झाले. तरीही देशात भ्रष्टाचार कमी झाला नाही. काळा पैसा बाहेर आला नाही. दहशतवादी कारवाया कमी झाल्या नाहीत. सीमेवर जवान हुतात्मा होत आहेत. दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या फायद्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरजोराने भाषण देऊन भारतीय जनतेच्या नजरेत धूळ फेकत होते. मला फक्‍त 100 दिवस द्या. त्यानंतर चौकात मला जाहीर फाशी द्या, असे वक्‍तव्य करीत होते. मात्र, नोटाबंदी पूर्णपणे फसली असल्याचे या दोन वर्षांत सिद्ध झाले आहे. त्यामुळे मोदी साहेब तो चौक कोणता ते सांगा?,'' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मोदी यांच्यावर केली.

नोटाबंदी पूर्णपणे फसली आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्‍ते नवाब मलिक म्हणाले, की नोटाबंदी ही एक प्रकारची मनमानी होती. यामुळे शंभरपेक्षा जास्त बळी गेले. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा गाडा अद्याप रूळावर आला नाही. नोटाबंदी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदी अत्यंत तावातावाने बोलत होते की या देशातील काळा पैसा बाहेर येणार आहे. दहशतवादी कारवाया थंड पडणार आहेत. मात्र, यापैकी काहीच झाले नाही. याउलट भारतीय जनतेचे अतोनात हाल झाले.

नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. हा निर्णय अविवेकी आणि अव्यवहारी होता, हे या दोन वर्षांत सिद्ध झाले आहे. या निर्णयामुळे शंभराच्यावर बळी गेले आहेत. याला जबाबदार कोण? यामुळे नोटाबंदी ही हुकूमशाही प्रवृत्तीचे उदाहरण आहे. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com