मुंबईत ओबीसींचे आक्रोश आंदोलन

agitation
agitation

मुंबई : मराठा समाजाच्या घुसखोरीला विरोध म्हणून आणि सरकार विरोधी आक्रोश म्हणून चिडलेल्या ओबीसी संघटनांनी उद्या (गुरुवार) सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘आक्रोश धरणे आंदोलन” आयोजित केले आहे.

या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी संघटना सामील होणार आहेत. तसेच यावेळी प्रथमच युवा वर्ग मोठ्या संख्येने उतरणार आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण सरकारने देऊ केले आहे. परंतु 52 टक्के ओबीसींना आजही पुरेसे आरक्षण दिले गेलेले नाही. 27 टक्के आरक्षण आधीच विविध जात समूहाला देवून 19 टक्केवार आणले आहे, त्यात जातनिहाय जनगणना न करता मराठा समाजाला एकतर्फी 16 टक्के आरक्षण देणे म्हणजे तमाम ओबीसी वर्गाची फसवणूक आहे. आधी ओबीसीसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करावी आणि मगच आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मराठा समजला आरक्षण द्यावे अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे.

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व जातीच्या संघटना सुद्धा सामील होणार आहे. प्रामुख्याने कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, अखिल भारतीय भंडारी महासंघ, आगरी-कोळी शेतकरी प्रबोधनी, कुणबी युवा मुंबई, तेली समाज संघटना, धनगर समाज संघ अशा विविध जात संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत. सरकारने कुणाच्या दबावाला बळी न पडता ओबीसींना न्याय द्यावा. चोर वाटेने ओबीसी होणारी घुसखोरी रोखावी. यासाठी हे आक्रोश आंदोलन आहे असे आवाहन ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर, सरचिटणीस राजाराम पाटील व कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com