मराठी शाळा वाचविण्यासाठी एक कोटी सह्यांचे निवेदन 

मराठी शाळा वाचविण्यासाठी एक कोटी सह्यांचे निवेदन 

मुंबई - राज्यातील मराठी शाळा वाचविण्यासाठी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना एक कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. 

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित, सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अडचणीत आल्या आहेत. इंटरनॅशनल, सीबीएसई मंडळाच्या शाळांचे पेव फुटू लागले असून, याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे, असा आरोप साळुंखे यांनी केला आहे. भाजपचे सरकार मराठी शाळांचे संरक्षण करू शकलेले नाही. या शाळा वचविण्याऐवजी इंग्रजी शाळांना मान्यता दिली जात आहे, असे ते म्हणाले. 

मराठी शाळा वाचविण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांतील लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सह्या घेण्यासाठी साळुंखे राज्यभरात फिरत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे. बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शाळांचे ऑडिट करावे, प्रत्येक शाळेत बालवाडी सुरू करावी, या मागणीसाठी लवकरच जनपरिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठी आणि अनुदानित शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. या शाळा वाचविण्यासाठी आणि महापुरुषांच्या राज्यात बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे. 
- भगवानराव साळुंखे, माजी शिक्षक आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com