कांद्याचा भाव पोचला चार हजारांच्या पुढे

onion
onion

नाशिक - दिवाळीनंतर लगेच कांद्याचा भाव सरासरी क्विंटलला चार हजार रुपयांच्या पुढे पोचला आहे. पण या भावाने विकण्यासाठी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्याचवेळी लेट खरीप कांद्याचे नुकसान पन्नास टक्‍क्‍यांच्यापुढे पोचले आहे. अशातच, नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी किमान पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने कांद्याचे भाव कमी होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

अवकाळी पावसाने कांद्याच्या पट्ट्यात दणका दिला असल्याने ५० हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी निम्मे नुकसान झाल्याचा प्राथमिक कृषी विभागाचा अंदाज आहे. पंचनाम्यानंतर कांद्याचे नेमके किती नुकसान झाल्याची याची स्थिती स्पष्ट होईल. लासलगावमध्ये दिवसभरात ७०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी ४,१०० रुपये असा भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत आणि विंचूर बाजार समितीत जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच, ४,३०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव निघाला आहे.

बंगळूरमध्ये ३,७०० चा भाव
बंगळूरमध्ये कांद्याला ३,७०० रुपये क्विंटल असा भाव निघाला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या घाऊक बाजारपेठेत कांदा ३,३७५ रुपये क्विंटल या भावाने विकला गेला. आता देशांतर्गत बाजारपेठेत वाढत चाललेल्या भावाचे पडसाद या आठवड्यात दिल्लीच्या बाजारपेठेत उमटतील. इंदूरमध्ये ३,९००, तर धुळ्यात ३,८५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांदे विकले गेले आहेत. मुंबईतील कांद्याच्या भावात ३,९०० रुपयांवरून ४,१०० रुपयांपर्यंत उसळी आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com