अन्यथा न्यायालयाकडून खड्डे तपासणी! 

Otherwise checking the potholes from the court
Otherwise checking the potholes from the court

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविल्याचा दावा करताना तो जबाबदारीने करा, अन्यथा खड्डे तपासणीचे काम न्यायालयीन अधिकाऱ्यांना देऊ, असा सज्जड दम आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. मंगळवारी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये सहा लोकांचा बळी गेला, त्याला जबाबदार कोण, असा सवालही या वेळी न्यायालयाने केला. 

"मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे 5 सप्टेंबरपर्यंत दुरुस्त करा आणि 10 सप्टेंबरपर्यंत अहवाल दाखल करा', असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. आज प्रभारी मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मंगळवारी मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातामध्ये सहा जण दगावले होते. या घटनेबाबत न्यायालयाने आज राज्य सरकारला फटकारले. राज्य सरकार खड्डे बुजविल्याचा दावा करते; मग मुंबई-गोवा महामार्गावर अपघात कसे काय होतात, मंगळवारी झालेल्या अपघाताची जबाबदारी कोणाची आहे, असे खंडपीठाने सरकारला विचारले. 

यावर, ही जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. म्हणजे तुमची यामध्ये काहीच जबाबदारी येत नाही का, असे न्यायालयाने सुनावले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आज सुनावणीला कोणीही उपस्थित नसल्यामुळे सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली. सरकारी वकिलांनी न्यायालयात दावा केला, की खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच अद्यापि मॉन्सून सुरू असल्यामुळे उत्सवाच्या काळातही कंत्राटदार काम सुरूच ठेवणार आहे, असेही सांगण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com