'बहिष्कारी साहित्यिकां'ना विवेक बाळगता आला नाही'

'बहिष्कारी साहित्यिकां'ना विवेक बाळगता आला नाही'

यवतमाळ- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ), ता.13 : "निमंत्रण वापसी प्रकरणाबाबत संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या भाषणातून जसा निषेध नोंदवला तसा तो नोंदवणे 'बहिष्कारी साहित्यिकां'नाही शक्य झाले असते. पण त्यांनी ते केले नाही. कारण त्यांना प्रसिद्धी हवी होती", अशी टीका भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांनी रविवारी येथे केली. राजकारणात साहित्यिक असतात, तसे साहित्यातही राजकारणी आहेत, अशी टिपण्णीही त्यांनी केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर अनेक मान्यवर लेखकांनी बहिष्कार टाकला आहे. पण परांजपे संमेलनात सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने 'निमंत्रण वापसी'बद्दल 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, "लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन ते नंतर रद्द करणे, याचा केव्हाही निषेधच व्हायला हवा. पण साहित्य संमेलनावर बहिष्कार घालणे, हा निषेध नोंदवण्याचा लेखकांचा प्रकार योग्य वाटत नाही. निषेध कोठे आणि किती याचा विवेक लेखकांना बाळगता आला पाहिजे. तो काहींना बाळगता आला नाही."

साहित्य संमेलनाला हजारो लोक लेखक, पुस्तके पाहण्यासाठी येतात. त्यांची निराशा लेखकांच्या हातून झाली आहे, हे मी येथे अनुभवत आहे. खरंतर एकाच माणसात साहित्यिक आणि लेखक अशी दोन्ही अंग असू शकतात. राजकारणी साहित्यिकावर स्वार होतो की साहित्यिक राजकारण्यावर, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण आपल्यातील राजकारणी बाजूला ठेऊनच साहित्यिकांनी संमेलनाला यायला हवे. आजचे वातावरण सरकारविरोधी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा सुरु आहे. त्याला खतपाणी घालण्याचे निमित्त शोधले जात आहे. याला आपण बळी पडू नये, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com