नागपूर : कोरोना (Corona Update) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जवळपास १७ लाख विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अकरावी, तंत्रनिकेतन (Polytechnic admissions) आणि आयटीआयच्या (ITI Admission) केवळ ९ लाख जागा आहेत. मात्र, प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही निर्णय जाहीर न केल्याने विद्यार्थी आणि पालकांवरील प्रवेशाचे दडपण वाढले आहे. (Parents and students have confusion about after 10th admissions)
दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जवळपास १७ लाख विद्यार्थी अकरावी, तंत्रनिकेतन आणि आयआयटी आदींसाठी पात्र ठरणार आहेत. राज्यात दहावीनंतर विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अभ्यासक्रमांची क्षमता ही ९ लाख आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे काय? त्यांच्या पुढील वर्गातील प्रवेशाचे काय?
सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार असल्याने त्यांना किती गुण मिळणार हेही सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना कशाच्या आधारावर त्यांना प्रवेश मिळणार आहे? यासंदर्भात अद्यापही संभ्रम आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील प्रवेश कुठल्या आधारावर होतील याचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यावर अजूनही निर्णय न झाल्याने शालेय शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करून काय साध्य केले? असा सवाल उपस्थित होत आहे.
(Parents and students have confusion about after 10th admissions)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.