जनतेचा मुड बदलला म्हणूनच; सैनिकांच्या शौर्याच राजकारण सुरु : शरद पवार

modi-pawar
modi-pawar

पुणे : पाच राज्यातील निवडणूकांमध्ये भाजपने तीन राज्य गमवली. यातून जनता आपल्याला नाकारत असल्याची जाणीव मोदींना होत आहे. त्यामुळेच पाकिस्तानवर हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचं आणि जवानांनी दाखविलेल्या शौर्याच मोदींनकडून राजकारण सुरु आहे. अशी स्पष्ट टिका राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली. नाशिक मध्ये सुरु असलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.

काश्मिर मधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्लात सीआरपीएफ चे 40 पेक्षा जास्त जवान हुतात्मा झाले. या घटनेमुळे संपुर्ण देश हळहळला होता. याचे प्रतिउत्तर म्हणून बारा दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. 


पाकिस्तान विरुद्धच्या या कारवाईमुळे भारतीय सैन्याची प्रतिष्ठा संपुर्ण जगात वाढली आहे. जवानांनी शौर्य दाखवलं, त्याग केला मात्र, दुसरेच लोक छाती फुगवून दाखवत आहेत. कसेही करून सत्ता राखायची यासाठी सत्तेचा गैरवापरही करण्याचे काम सरकार कडून सुरु आहे. भाजपचे गड असलेल्या हिंदी पट्ट्यातील तीन राज्य भाजपच्या हातातून गेली आहेत. जनतेचा मुड बदलत आहे याची जाणीव झाल्यानेच हवाई हल्ला आणि लष्करी कारवाईचं राजकारण मोदी सरकारकडून सुरु असल्याचेही पवार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com