मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या (maharashtra government) मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) बुधवारी (12 जानेवारी) मोठा निर्णय झाला. या निर्णयान्वये आता राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतील (marathi language) नावाचे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयावरून आता राजकारण (politics) सुरू झालं आहे
शिवसैनिकांकडून दुकानदारांना नोटीस
शिवसेनेने विलेपार्ले विभागातील दुकानदारांना मराठी पाट्या ठळक अक्षरातच दिसल्या पाहिजे असं स्मरणपत्र दुकानदारांना देण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईतील दुकानदारांना स्मरणपत्र नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. आतापासून प्रत्येक दुकानदाराला त्याच्या दुकानाचे नाव मराठीत लिहावे लागेल. तसेच दुकानावरील नाव मराठी भाषेत आणि मोठ्या ठळक अक्षरात लिहावे लागणार आहे. तसेच दुकानांची नावे ठळक अक्षरात लिहिण्याचा आदेश खास अशा दुकानदारांसाठी देण्यात आला आहे.
दरम्यान, हा निर्णय 2017 मध्येच घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्याची योग्य अंमलबजावणी होत नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र दुकानांवर अधिनियम 2017 म्हणजेच 2017 च्या महाराष्ट्र दुकाने आणि वसाहती (रोजगार आणि सेवेच्या अटी) प्रभावीपणे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.