मंत्रालयातच दूषित पाणीपुरवठा; 100 कर्मचाऱ्यांना त्रास

mantralaya
mantralaya

मुंबई : दूषित पाणीपुरवठ्याची झळ थेट मंत्रालयाला बसली आहे. विविध विभागांतल्या जवळपास 100 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दूषित पाणी प्यायलाने त्रास झाला. 

प्रारंभी मळमळ, नंतर उलट्या आणि जुलाबाने त्रस्त झालेल्या या कर्मचाऱ्यांना आज अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे रुग्णालयात नेण्याची वेळ आली. मंत्रालयाला पाणीपुरवठा होतो, तो दूषित असल्याचा संशय गेले कित्येक दिवस व्यक्‍त केला जात होता. आज त्याचे दुष्परिणाम दिसून आले. राज्याचा कारभार जेथून चालतो तेथेच दूषित पाणी का मिळते, असा प्रश्‍नही समोर आला. सभागृहातही हा प्रश्‍न आज विचारला गेला.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित करत सरकारला जाब विचारला. अखेर सभागृहनेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याची कबुली देत योग्य खबरदारी घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com