ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडू आक्रमक

Mumbai
Mumbai

अमरावती : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता.१४) प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी मुंबई येथील राज्यभवनावर धडक देण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज दुपारी बच्चू कडू व प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आझाद मैदानातून राजभवनाकडे कूच केली. परंतू विधीमंडळाच्या समोरील रस्त्यावर या सर्वांना पोलिसांनी अडविले व त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. 

विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर सत्तास्थापनेचा गुंता सुटला नाही, त्यातच अवकाळी पावसाने शेतक-यांचे उभे पीक गेल्याने त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यांनी आज राजभवनावर धडक देण्याची घोषण केली होती. त्या अनुषंगाने विदर्भ तसेच राज्याच्या अन्य भागातून शेतकरी मुंबईत दाखल झाले होते. 

ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी राजभवनाला घेरावदेखील घालण्यात येणार होता. परंतु या आंदोलनापुर्वीच पोलिसांनी आंदोलनकत्र्यांना स्थानबद्ध केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com