पावसाची ६१ तालुक्‍यांत दडी

Rain
Rain

सोलापूर - राज्यभरातील ६१ तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्‍केही पाऊस झाला नसून, केंद्र सरकारच्या पीक अंदाज केंद्रातर्फे या तालुक्‍यांमधील पिकांची वाढ, जमिनीतील आर्द्रतेची पडताळणी ॲपद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार चार हजार कोटींचे नुकसान झाल्याचा नजरअंदाज सरकारला पाठविण्यात आला असून, संबंधित तालुक्‍यातील पिकांची सत्यता पडताळणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी स्तरावर सत्यता पडताळणीला सुरवात होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अहवाल राज्य सरकारला जमा होतील आणि ऑक्‍टोबरअखेर शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, असे नियोजन सरकार पातळीवरून करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मागील वर्षी दुष्काळामुळे लातूर, अमरावती, नाशिक, पुणे विभागात पिण्याच्या पाण्याचे तब्बल सहा हजार टॅंकर सुरू झाले. अद्याप त्याचे प्रमाण कमी झाले नसून चारा छावण्याही सुरूच आहेत. मागील दुष्काळाची तीव्रता कायम असतानाच यंदाही नैसर्गिक पावसाची दडी अन्‌ कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या विमानांच्या हवेत नुसत्याच घिरट्यांमुळे सरकार हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या तालुक्‍यांमधील सद्यःस्थितीची सत्यता पडताळणी करण्याचे नियोजन युद्धपातळीवर केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com