नाशिक - राज्यात 1 जूनपासून 16 जुलैपर्यंत 112.7 टक्के पाऊस झाला आहे. त्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेले 22 जिल्हे आहेत. 9 जिल्ह्यांत 75 ते 100 टक्के, तर 3 जिल्ह्यांत 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. तसेच खरिपाच्या 72 टक्के पेरण्या झाल्या असून गेल्यावर्षीच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तीळ, कारळे, सूर्यफुलाचा पेरा कमी झाला आहे.
नंदुरबार, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात 50 ते 75 टक्के, तर नाशिक, धुळे, जळगाव, नगर, कोल्हापूर, जालना, बीड, बुलडाणा, भंडारा जिल्ह्यात 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तसेच 355 तालुक्यांपैकी दोन तालुक्यांत 25 ते 50, 58 तालुक्यांत 50 ते 75, 78 तालुक्यांत 75 ते 100 टक्के, तर 217 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
राज्यात गेल्यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत 1 कोटी 1 लाख 19 हजार 692 हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा आतापर्यंत 1 कोटी 78 हजार 435 हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कारळे आणि सूर्यफुलाचे क्षेत्र पन्नास टक्क्यांहून अधिक घटले आहे. ज्वारीच्या पेरण्या 21, बाजरीच्या 13, नाचणीच्या 31, मुगाच्या 8, उडदाची 24, तिळाच्या 2, कापसाची एक टक्क्याने कमी झाल्या आहेत.
पर्जन्य टक्केवारीनिहाय तालुक्यांची संख्या
विभाग 50 ते 75 टक्के 75 ते 100 टक्के 100 टक्क्यांपेक्षा अधिक
कोकण 1 1 45
नाशिक 15 10 15
पुणे 13 9 16
कोल्हापूर 4 7 22
औरंगाबाद 13 10 4
लातूर 5 12 31
अमरावती 5 15 36
नागपूर 2 14 48
|