राज्यातील सातही उमेदवार बिनविरोध 

rajysabha-filephoto
rajysabha-filephoto

मुंबई - राज्यातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आज केली. अर्ज मागे घेण्याची आजची अठरा मार्च ही शेवटची तारीख होती. सातही जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने उमेदवारांच्या विजयाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी होती. राज्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, कॉंग्रेसतर्फे राजीव सातव, भाजपतर्फे उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड आणि शिवसेनेतर्फे प्रियांका चतुर्वेदी यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे. येत्या दोन एप्रिल रोजी राष्ट्रपती कार्यालयाकडून तशी अधिसूचना काढण्यात येणार आहे. 

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्‍यक असतात त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे तीन उमेदवार सहज निवडून येतील, अशी परिस्थिती होती. देशभरातील राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला मतदान होणार होते तर त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता निकाल जाहीर होणार होता. महाराष्ट्रातील सातही जागांचा यामध्ये समावेश होता. देशातील सतरा राज्यांतून ५५ सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com