"शिंदे बाळासाहेबांच्या विचाराने चालले आहेत अन् उद्धवजी पवारांच्या विचाराने"

नवा पक्ष स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही, आम्ही सर्वजण शिवसेनेतच आहोत असं रामदास कदम म्हणाले आहेत.
Ramdas Kadam
Ramdas Kadam esakal

मुंबई : शिवसेनेच्या नेतेपदाचे राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांची शिंदे गटाने आपल्या गटाच्या नेतेपदी निवड केली होती. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या टीकेवर त्यांनी उत्तर दिलं आहे. नवा पक्ष स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही, आम्ही सर्वजण शिवसेनेतच आहोत असं रामदास कदम म्हणाले आहेत.

(Ramdas Kadam On Shivsena Uddhav Thackeray)

एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालले आहेत आणि उद्धव ठाकरे शरद पवारांचे विचारांनी पुढे चालले आहेत अशी टीका कदमांनी केली आहे. उद्धव ठाकरेंचे विचार हे राष्ट्रवादी पुरस्कृत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत असताना शिवसेनेची वाढ नाहीतर संपवण्याचं काम झालं. पवारांच्या विचाराने चालल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दबावाखाली काम करावे लागत होतं असा आरोप कदमांनी केला.

Ramdas Kadam
आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला 'तो' पूल मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा उभारला

शिवसेनेला भगव्याची अस्मिता असताना तुम्ही शरद पवारांच्या विचाराने का चालतात याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे. ज्याने शिवसेनेसाठी प्राणाच्या आहुती दिल्या, काही लोकांनी कित्येक केसेस अंगावर घेतल्या तरीपण तुम्ही भेटायला आलेल्या काहीजणांना कित्येक तास ताटकळत ठेवलं असा आरोप कदमांनी केला आहे.

"माझ्या मुलाच्या मतदारसंघात मनसेचा खेडमधील नगराध्यक्ष राष्ट्रवादीचं काम करत आहे. त्याच्या विरोधातील भ्रष्टाचाराची प्रकरणे माझ्या मुलाने बाहेर काढली होती, १० नगरसेवकाने त्याला अपात्र करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला होता. ती फाईल आम्ही कारवाईसाठी वरती पाठवली होती पण त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, शिवसेनेच्या मुळावर उठलेल्या नगराध्यक्षाच्या कारवाईबद्दल मी शिंदेंना विचारले असता त्यावर शिंदे म्हणाले की, यावर मीही मुख्यमंत्र्यांशी बोललो पण उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की, मी पवारांना शब्द दिलाय त्यामुळे मी त्या नगराध्यक्षावर कारवाई करू शकत नाही. असं असेल तर आम्ही कसं काम करायचं?" असा सवाल कदमांनी व्यक्त केला आहे.

Ramdas Kadam
राष्ट्रवादी निवडणुकीसाठी तयार; पण कोर्टाच्या निकालावर पवारांची चिंता

"या नगराध्यक्षावरील कारवाई संबंधित मी विधानपरिषदेत प्रश्न केला होता. पण शरद पवारांच्या सांगण्यावरुन तुम्ही काम करत असाल तर माझा मुलगा आणि मी पळपुटा कसा? तुम्ही वर्षा सोडली तेव्हा आम्हालाही वाईट वाटलं पण तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून निर्णय घेऊन शिवसेना संपवण्याचं काम केलं." असा आरोप केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com