पुणे : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा वाढत असताना केंद्रिय मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक फॉर्म्युला समोर आणला आहे. दानवे यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून सरकार स्थापन करण्यासाठी 1995 चा फॉर्म्युला सुचवला आहे. आम्ही या फॉर्म्युल्यावर काम करू आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होईल, असे दानवे यांनी म्हटले आहे.
दानवे म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला जनादेश मिळाला आहे. आमच्यामध्ये भांडण नाही. आमच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत. ते आम्ही एकत्र बसून चर्चा करून सोडवू. दरम्यान, आम्ही 1995 च्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर विचार करत असून, राज्यात भाजप आणि शिवसेनेचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल नितीन गडकरी घेतात...
1995 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे तत्कालीन बडे नेते प्रमोद महाजन यांच्यात युतीचा एक फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि तर कमी जागा असणाऱ्यांकडे उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती राहतील, असे निश्चित झाले होते त्या फॉर्म्युल्यानुसार सत्तेचे वाटप आम्ही करू असेही दानवे यांनी म्हटले आहे.
भाजपचंही दिल्लीत ठरलंय, 'या' दोन गोष्टींवर अजिबात तडजोड नाही!
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फडणवीस यांनी राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असे सांगितले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.