जनतेला वाटतंय सेना-भाजपनी एकत्र यावे- दानवे (व्हिडीओ)

जनतेला वाटतंय सेना-भाजपनी एकत्र यावे- दानवे (व्हिडीओ)

अमरावती- मागील 25 वर्षापासून भाजपा-शिवसेना यांची युती आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढविल्या आहेत. 2014 हे वर्ष सोडले तर आम्ही नेहमी एकत्रच मैदानात उतरलो त्यामुळे आता राज्याच्या जनतेचे मत आहे कि. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवावी, असे मत आज (ता. 29) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ही युती प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तसेच, मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवायला हवी आणि विरोधी पक्षांच्या मनसुब्यांना उधळून लावायला हवे, असे मतही दानवे यांनी यावेळी व्यक्त केले. 

यावेळी रावसाहेब दानवे यांचे अमरावती शहरातील राजकमल चौकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. रावसाहेब दानवे हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com