रिफायनरी प्रकल्प अन्यत्र हलवणार 

रिफायनरी प्रकल्प अन्यत्र हलवणार 

मुंबई - नाणार येथे उभारण्यात येणारा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला असला, तरी तो महाराष्ट्रातच अन्यत्र हलवला जाणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला कळवण्यात आले आहे. महाराष्ट्राला दहा वर्षे पुढे नेणारा हा प्रकल्प अन्य राज्यांत वळवला जाऊ नये, यासाठी गेल्या काही महिन्यांपासूनच पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. 

नागपूरलगत विदर्भात हा प्रकल्प व्हावा, अशी मागणी काही जणांनी केली असली, तरी समुद्रालगत या प्रकल्पाचे महत्त्व असल्याने तो रायगड जिल्ह्यात उभारता येईल काय, यावर विचार सुरू आहे. रायगड जिल्ह्यात अनेक नवे प्रकल्प उभे रहात आहेत. त्यात रिफायनरीसाठी जागा शोधता येईल काय, स्थानिक त्यास मान्यता देतील काय, असे प्रश्‍न जागा निश्‍चित करण्यापूर्वी विचारात घेतले जाणार आहेत.

शिवसेनेला नाणारवरून प्रकल्प हलवतानाच तो अन्यत्र हलवल्यास त्याचे राजकारण करू नका, असे सांगण्यात आले आहे. शिवसेनेनेही यास मान्यता दिली आहे. नाणार भोवताली विस्थापनाचा प्रश्‍न मोठा नव्हता, तेथे मोठे पॅकेज दिले गेले तर स्थानिकांचा विरोध मावळण्याची शक्‍यता होती, असे गृहीत धरून पुढे जाण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, आता त्यासंबंधात कोणताही निर्णय घेणे कठीण ठरणार आहे. युती करताना महाराष्ट्राला मागे नेणारे निर्णय का झाले असा सवाल केला जात असतानाच, गुंतवणूकदारांनी नाराज होऊ नये, असे सांगण्यात आले असल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com