चिराग-तेजस्वींनी एकत्र यावं; लालू प्रसाद यादवांनी व्यक्त केली इच्छा

चिराग-तेजस्वींनी एकत्र यावं; लालू प्रसाद यादवांनी व्यक्त केली इच्छा

नवी दिल्ली : चारा घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले लालू प्रसाद यादव यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेले लालू आता पुन्हा एकदा बिहारच्या तसेच राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. कालच लालू प्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी आज समाजवादी नेते शरद यादव यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भेटीमागचं कारण स्पष्ट केलं. तसेच बिहारच्या राजकारणातील काही गोष्टींबाबतही मते मांडली.

चिराग-तेजस्वींनी एकत्र यावं; लालू प्रसाद यादवांनी व्यक्त केली इच्छा
हॉस्पिटलमध्ये आजारी महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार
चिराग-तेजस्वींनी एकत्र यावं; लालू प्रसाद यादवांनी व्यक्त केली इच्छा
नवी मुंबई विमानतळाचा वाद मिटेना! हाती मशाल घेऊन होणार आंदोलन

बिहारमध्ये चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांच्या युती होईल का? ते एकत्र येतील का यासंदर्भात विचारल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय की जेही झालंय, त्यानंतरही (लोजपामधील अंतर्गत संघर्ष) चिराग पासवान हेच लोजपाचे नेते आहेत. होय, मला त्या दोघांना एकत्रितपणे पहायचं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, आम्ही बिहारमध्ये सरकार बनवणार होतो. मी तुरुंगात होतो मात्र माझा मुलगा तेजस्वी यादव एकटा निवडणुकीत लढला. त्यांनी फसवणूक करत विजय १०-१५ मतांनी आमचा पराभव केला.

चिराग-तेजस्वींनी एकत्र यावं; लालू प्रसाद यादवांनी व्यक्त केली इच्छा
MNS:मनसेच्या दणक्यानंतर 'त्या' कंपनीची माफी;पाहा व्हिडिओ

मी शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. त्यांना बरं नव्हतं. त्यांच्याशिवाय संसद म्हणजे वाळवंटासारखी असते. त्यामुळेच, मी, शरद भाई आणि मुलायम सिंह यादव आम्ही तिघांनी अनेक मुद्यांसाठी एकत्रितपणे संघर्ष केला आहे. काल मी मुलायम सिंह यादव यांची घेतलेली भेट देखील एक शिष्टाईची भेट होती. पेगॅसस हेरगिरीच्या प्रकरणाबद्दल विचारले असता त्यांनी म्हटलंय की, होय. पेगॅसससंदर्भातील तपास झाला पाहिजे. ज्यांची नावे यात आहेत, ती प्रसिद्ध केली गेली पाहिजे.

चिराग आणि तेजस्वी यांच्या एकत्रित येण्यासंदर्भात लालूंनी केलेल्या वक्तव्यावर चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, मी त्यांच्या मताचा आदर करतो मात्र, माझा सध्याचा प्राधान्यक्रम हा 'आशीर्वाद यात्रा' आहे, तसेच माझी संघटना मजबूत करणे, हे आहे. बिहार अथवा युपीमधल्या कोणत्याही युतीसंदर्भातील चर्चा या आता येत्या निवडणुकीत होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com