विहामांडवाचा रस्ता सात वर्षांपासून बंद 

road has been closed for seven years
road has been closed for seven years

विहामांडवा (ता. पैठण) : विहामांडवा हे पैठण तालुक्‍यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेले गाव; परंतु खराब रस्ते व धोकादायक पुलामुळे बाजारपेठ भकास होत चालली आहे. टाकळी अंबड ते विहामांडवा रस्त्यावर असलेला जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील पूल धोकादायक असल्याचे कारण देत पाटबंधारे विभागाने या पुलावरील वाहतूक गेल्या सात वर्षांपासून बंद केली आहे.

त्यामुळे या रस्त्याची अवस्था "असून अडचण, नसून खोळंबा' अशी झाली आहे. या प्रश्‍नाबाबत पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. त्यामुळे विहामांडवा, टाकळी अंबड, आवडे उंचेगाव, रामनगर, विठ्ठलनगर, हनुमाननगर आदी गावांतील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शाळा, महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी अशा सर्वांनाच इच्छितस्थळी जाण्यासाठी सुमारे 12 किलोमीटरचा फेरा पडतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com