"अर्थव्यवस्था पवारांच्या घरीच पाणी भरणार"

कागदावरचा बजेट महाराष्ट्रातील विकासासाठी कधीच आला नाही - सदाभाऊ खोत
Sadabhau Khot and Ajit Pawar
Sadabhau Khot and Ajit Pawarसकाळ डिजिटल टीम

११ मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. यावेळी महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारा देशातील पहिले राज्य असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरुन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी ट्वीट द्वारे अजित पवार यांच्यावर ताशेरे ओढले

सदाभाऊ खोत ट्वीट द्वारे म्हणाले, “कागदावरचा बजेट महाराष्ट्रातील विकासासाठी कधीच आला नाही. त्यामुळे ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारा शब्द जनतेला कळला नाही. म्हणूनच राज्यातल्या आत्महत्या थांबू शकल्या नाहीत.” सोबत आणखी एक ट्वीट करत त्यांनी पवारांवर हल्लाबोल केलाय, “काय फरक पडलाय महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या आयुष्यात? अर्थव्यवस्था पवारांच्या घरीच पाणी भरणार."

Sadabhau Khot and Ajit Pawar
"महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री तरी हिंदूंना एकत्र करणे म्हणजे चोरी!"

अर्थसंकल्पावर भाजपनेसुध्दा टीका केली होती

राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या योजना म्हणजे भाजपने यापूर्वी केलेल्या घोषणांचाच पाढा यंदाच्या अर्थसंकल्पात वाचला गेला आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा केली होती. गरीब, बारा बलुतेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे. आताचा जो अर्थसंकल्प मांडला तो कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. बजेटवरून चार बातम्या तयार होऊ शकतात. यापलिकडे काहीच नाही असे देखील फडणवीस यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com