‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा

Sakal-Relief-Fund
Sakal-Relief-Fund

मदतीचा ओघ सुरूच; अातापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा
पुणे - ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी अन्नधान्य, औषधे, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अन्नधान्य तसेच अत्यावश्‍यक वस्तूंचे पाच ट्रक कोल्हापूर आणि सांगली भागात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे नागरिकांच्या मदतीचा ओघ सुरूच असून, आतापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा झाला आहे.

पूरग्रस्तांचे संसार उभे राहावेत आणि त्यांना आवश्‍यक ती तातडीची मदत मिळावी, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने डाळ, तांदूळ, आटा, तसेच इतर अन्नधान्यांचा समावेश असणारे किट, औषधे, संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले आहे. पुणे आणि मुंबई येथून ही मदत पाठवली जात आहे. ही मदत गरजूंपर्यंत पोचवण्याची यंत्रणा ‘सकाळ’च्या वतीने उभी करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि ‘सकाळ’ यांच्यावतीने मदतीचे योग्य पद्धतीने वाटप करण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व स्तरांतून नागरिक समोर येत आहेत. विविध सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, व्यापारी, गणेश मंडळे, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था यांच्या वतीने ‘सकाळ रिलीफ फंडा’ला निधी दिला जात आहे.

या निधीतून तातडीची मदत म्हणून विविध वस्तूंचा पुरवठा पूरग्रस्त भागात केला जात आहे. पूरग्रस्त भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने करण्यात आले आहे. बुधवार पेठेतील ‘सकाळ’ कार्यालयात १५ ऑगस्टलाही निधी स्वीकारला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com