समीर वानखेडे यांच्यावर सध्या क्रूझ ड्रग पार्टीवरुन गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. तर त्यानंतर क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणावर केलेल्या कारवाईतील पंच के.पी. गोसावी यांनी केलेल्या आरोपांमुळे देखील या प्रकरणाची गुंतागूतं वाढत गेली आहे. त्यानंतर आता वानखेडे यांची एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. त्यातच समीर वानखेडे दिल्लीला रवाना होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावर वानखेडे यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.
आर्यन खान प्रकरणावरून आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले. माझ्यासह माझ्या कुटुंबावर दबाव आहे आणि माझ्या जीवालाही धोका आहे असे सांगत वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व हालचाली सुरू असतानाच समीर वानखेडे हे दिल्लीला रवाना होत असल्याची माहिती समोर आली. अचानक दिल्लीला जाण्याच्या योजनेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "दिल्लीला जाण्याचं दोन महिन्यांपूर्वी ठरलं होतं असं त्यांनी स्पष्ट केलं."
के.पी. गोसावी हे क्रूझ प्रकरणातील एक पंच असल्याचं एनसीबीने सांगितलं होतं. गोसावी यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असतानाच त्यांचे सहकारी प्रभाकर साईल यांनी या प्रकरणाबद्दल एक खळबळजनक खुलासा केला. त्यानुसार या प्रकरणात 25 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा आरोप साईलन केलाय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.