मुंबई ते नागपूर या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आता शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचा मार्ग 26 मे रोजी खुला होणार आहे. त्यामुळे आता नागपूरहून नाशिकपर्यंत प्रवास करता येणार असून हे अंतर वाहनांना सहा तासांत पर करता येणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील भरवीर गाव ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर, नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला केला जाईल.
"ठाण्यातील वडपेपर्यंतचा उर्वरित 100 किमीचा रस्ता या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल," असे यादव म्हणाले.
दरम्यान, प्रकल्पाचा पहिला टप्पा वाहनांसाठी खुला झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), राज्य वाहतूक पोलीस आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या नेतृत्वाखालील समितीने एमएसआरडीसीला काही जागा रंगवण्याची सूचना केली आहे. तसेच वाहन चालकांना सतर्क ठेवण्यासाठी पोलिस सायरनचा आवाज निर्माण करणारी उपकरणे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई ते भरवीर या उर्वरित 200 किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणं आता शक्य होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.