अडीच वर्षांत साडेसहा हजार आत्महत्या

कर्जाच्या वाढत्या बोजाने शेतकरी हतबल : कोकणात एकही आत्महत्या नाही
Six and a half thousand suicides in two and a half years Farmer rising debt No suicides in Konkan
Six and a half thousand suicides in two and a half years Farmer rising debt No suicides in Konkansakal

सोलापूर : महापूर, अतिवृष्टीचा तडाखा, पावसाच्या पाण्यात वाहून गेलेली पिके, शेतमालाला भाव नाही, सरकारकडूनही पुरेशी मदत मिळत नाही, २० महिने सांभाळूनही गाळपासाठी वेळेत ऊस गेला नाही, अशा अनेक समस्यांमुळे बळिराजा हतबल झाला आहे. त्यातच बॅंका व खासगी सावकारांचे कर्ज, मुलींचा विवाह आणि मुलांच्या शिक्षणाची चिंता यातून अडीच वर्षांत राज्यातील सहा हजार ५८९ शेतकऱ्यांनी गळफास घेतला.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, अशी सोय करण्याचा निर्णय झाला. पण, पुढे काही झाले नाही. जानेवारी २०२० ते जून २०२२ या अडीच वर्षांत कोकण विभागात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झाल्या आहेत. अडीच वर्षांत त्याठिकाणी दोन हजार ८०१ तर औरंगाबाद विभागातही दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सरकारकडून दोन-तीन लाखांची मदत मिळते. पण, मदती देण्याआधी आत्महत्येची कारणे, तो शेतकरी होता का, अशा विविध कारणांची पडताळणी केली जाते. अडीच वर्षांत एक हजार ७०० कुटुंबांना मदत मिळालेली नाही.

जमिनी सावकारांच्या नावे

हतबल बळिराजाकडून खासगी सावकारांनी व्याजाने दिलेल्या रकमेपोटी जमिनी बळकावल्याच्या तक्रारी वाढत आहेत. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत जिल्हा उपनिबंधकांनी (डीडीआर) गेल्या १४ वर्षांत १,३०९ एकर जमीन ८२९ शेतकऱ्यांना परत मिळवून दिली आहे. जमिनी बळावल्याच्या ८,३७७ तक्रारी आठ वर्षांत सहकार आयुक्तालयाकडे दाखल झाल्या आहेत. त्यातील ३९३ सावकारांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत.

बीडमध्ये जूनमध्ये रोज एक शेतकरी आत्महत्या

आत्महत्यांचा टक्का वाढत असून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा चिंता वाढवीत आहे. रोज एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. जून महिन्याच्या ३० दिवसांत ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यंदाच्या जून पर्यंतच्या सहा महिन्यांतील १८१ दिवसांत १३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा आत्महत्यांचा आकडा ५४ ने अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com