'मोदीजी, हवाई दलाच्या कारवाईचे राजकारण करू नका'

Narendra Modi
Narendra Modi

मुंबई : पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचे राजकारण करू नये, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले आहे.

भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आल्याने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त झाले आहे. पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्याने दिल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईची माहिती सर्वांसमोर आली. भारतीय हवाई दलाच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकले. या कारवाईचे भारतातून कौतुक करण्यात येत आहे.

अबू आझमी म्हणाले, की भारताच्या हवाई दलाच्या जवानांना मी सॅल्युट करतो. पाकिस्तानमध्ये सतत सर्जिकल स्ट्राईक व्हायला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी याचे राजकारण करू नका. भारतीय जवानांचे कौतुक आहे. या कारवाईचे पूर्ण श्रेय भारतीय लष्कराला आहे. पंतप्रधानांनी लष्कराला कारवाई करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com