सोलापूर : राज्यात 1 ते 28 मार्च या काळात तब्बल साडेपाच लाख रुग्ण वाढले असून, दोन हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील अवघे 46 टक्केच लोक मास्कचा वापर करतात आणि उर्वरित लोक मास्कचा वापर करत नसून नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दहा ते 15 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला जाण्याची दाट शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तसा इशारा दिला आहे. बुधवारी (ता. 31) मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाउनसंदर्भात अंतिम निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वीच सरकारच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर दुकाने, हॉटेल, बिअर बार, मंदिरे, धार्मिक स्थळे, सभा, आंदोलने, मोर्चे, विवाह समारंभावर निर्बंध घालण्यात आले. तरीही नियमांचे तंतोतंत पालन होत नसल्याचे समोर आले. मार्चपूर्वी राज्यात दररोज सरासरी सहा ते साडेसहा हजार रुग्ण आढळत होते. तर मृत्यूचे प्रमाण दररोज सरासरी 35 ते 40 पर्यंतच होते. आता मात्र, रुग्णांचे प्रमाण दररोज 38 ते 40 हजार तर मृत्यूचे प्रमाण 100 ते 125 झाले आहे.
राज्यात तीन लाख 57 हजार आयसोलेशन बेड उपलब्ध असून त्यापैकी एक लाख 10 हजार बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे 60 हजार 349 ऑक्सिजन बेडपैकी 13 हजार बेड सध्या वापरात आहेत. नऊ हजार व्हेंटिलेटर खाटांपैकी दोन हजार खाटा वापरात आहेत. निर्बंध घालूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांचा कडक लॉकडाउनचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
कोरोनाची 1 मार्चची स्थिती
28 मार्चची स्थिती
ठळक बाबी...
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.