त्यांना अभिनंदनला सोडावेच लागणार होते : उज्ज्वल निकम

Ujjwal Nikam
Ujjwal Nikam

मुंबई : 'भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना परत करण्याबाबात पाकिस्तावर दबाव टाकण्यात भारत यशस्वी झाला आहे. भारताने जैश ए महंमदचे दहशतवादी तळ उध्वस्त करून जगाचा पाठिंबा मिळवला आहे,' असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 'साम'शी बोलताना सांगितले.

'जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यासाठीची मागणी अमेरिका, रशिया व इंग्लंड या देशांनीही उचलून धरली आहे. याबाबत चीनची भूमिका काय असेल हे बघणे महत्त्वाचे ठरेल,' असे निकम यांनी सांगितले. तसेच दोन्ही देश हे अण्वस्त्रसज्ज असल्याने कोणत्याही परिस्थितीत युद्ध हे दोन्ही देशांना परवडणारे नाही. काल इम्रान खान यांची भूमिकाही सामोपचाराची होती. असेही मत निकम यांनी व्यक्त केले. 

दहशतवाद्यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेला हवाई हल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. भारत कोणत्याही परिस्थीतीत दहशतवादाला पोसणार नाही, आमच्या सार्वभौमत्त्वावर घाला घालणाऱ्यांना भारतीय लष्कर चांगला धडा शिकवेल. तसेच जिनिव्हा करारानुसार सर्व नियमांचे पालन पाकला करावे लागेल व अभिनंदन यांना परत करावे लागेल, असेही निकम यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com