सरकार स्थापनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले वक्तव्य; म्हणाले...

सरकार स्थापनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले वक्तव्य; म्हणाले...

अकोला : निवडणूक निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप सरकार स्थापन करण्याचा निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत अकोला दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच सर्वांच्या हिताचे सरकार स्थापन करू, असे सांगितले.

अतिवृष्टीने बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वं विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा तिढा लवकरच सोडवून सर्वांच्या हिताचे सरकार स्थापन करू, असे सांगितले.

सध्या शेतकरी अडचणीत आहे. हंगामी सरकारला निर्णय घेताना काही मर्यादा असतात. त्यामुळे लवकरात लवकर सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवून सर्वांच्या हिताचे सरकार लवकरच स्थापन करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र शिवसेनेबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com