आत्महत्याग्रस्त बळिराजाचे कुटुंब बेघरच

Farmer-Suicide
Farmer-Suicide

पाच वर्षांत १६ हजार आत्महत्या; घरकुलासाठी स्वतंत्र योजना नाही
सोलापूर - नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला भाव न मिळणे, कर्जाचा विळखा यासह इतर कारणांमुळे राज्यभरात पाच वर्षांत १५ हजार ७४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देण्याचा निर्णय होऊनही राज्यातील सुमारे नऊ हजार कुटुंबांना अद्याप पक्‍के छत मिळाले नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद, अमरावती, नाशिक या विभागांत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. बीड, बुलडाणा, जालना, परभणी, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नांदेड, नागपूर, धुळे या जिल्ह्यांसह पुणे विभागातील सांगली व सोलापुरातही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ तत्काळ मिळावा या उद्देशाने प्रत्येक कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करणे, या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देणे असा निर्णय झाला. 

राज्यात दररोज सरासरी पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर २०१९ दरम्यान राज्यभरातील दोन हजार ७९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिली. जानेवारी २०१४ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत राज्यातील १५ हजार ७४८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपैकी सुमारे साडेसहा हजार कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळाली आहेत. उर्वरित कुटुंबीयांना अद्याप सरकारी कार्यालयांचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत.

राज्याची स्थिती (२०१४ ते सप्टेंबर २०१९)
९,२०० बेघर कुटुंबे
१५,७४८ शेतकरी आत्महत्या
६,५०० घरकुल मिळालेली कुटुंबे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com