मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांनी यासंदर्भात बिनशर्त माफीही मागितली होती.
आयआरएस समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांवर 1.2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. याप्रकरणी आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात सांगितलं होतं की, ते वानखेडे यांच्याविरोधात कुठलाही आक्षेपाहार्य वक्तव्य करणार नाहीत. मुंबई हायकोर्टात मलिक यांनी यासंदर्भात बिनशर्त माफीही मागितली होती. मात्र ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात आक्षेपाहार्य वक्तव्य दिल्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर देखील नवाब मलिकांनी 28 डिसेंबर, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या रोजी त्यांच्या कुटुंबावर आपत्तीजनक विधान केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारे वानखेडेंवर टिप्पणी करु नये असा आदेश दिले आहे.
नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर एक विधान केले होते, ज्यासाठी त्यांना न्यायालयाने फटकारले होते आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यात मलिक यांनी वानखेडे प्रकरणामध्ये यापुढे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी मानहानीचा दावा दाखल केल्याने मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.