मुंबई : राज्यातील भाजपच्या १२ निलंबित आमदारांना केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे. आयोगाच्या निर्णयामुळं राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगानं १७ सप्टेंबर रोजी यासंदर्भात पत्रक काढून आपला निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.
आपल्या पत्रकात निवडणूक आयोगानं म्हटलं की, भाजपच्या १७ आमदारांचं निलंबन झाल्यानं त्यांना सभागृहातून मतदान करता येणार नाही. त्यामुळे विधान भवनाबाहेर स्वतंत्र मतदार कक्ष उभारण्याची सोय महाराष्ट्राच्या विधी मंडळाच्या प्रशासनानं करावी. आयोगाच्या या सूचनेनुसार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत निलंबित आमदारांना अशा प्रकारे मतदानाचा हक्क बजावता येईल.
दिवंगत खासदार आणि काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या रिक्त जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनी पाटील यांना तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. रजनी पाटील या गांधी कुटुंबियांच्या जवळच्या मानल्या जातात. तर भाजपचे उमेदवार असलेले उपाध्याय हे भाजपचे सरचिटणीस असून २०१७ च्या महापालिका निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.