१० वर्षांपासून टॅंकरमुक्त जिल्ह्यात पाण्यासाठी टॅंकर! १५ दिवसांत उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी संपले

डाळिंब, केळी, द्राक्ष अशा पिकांना उजनीचा आधार आहे. तसेच अनेक उद्योग, शहरांचा पाणी पुरवठा देखील उजनीवर अवलंबून आहे. आता धरण पहिल्यांदाच मेच्या सुरवातीला मायनसमध्ये गेल्याने पाऊस लांबल्यास जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट ओढवू शकते.
sakal-exclusive
sakal-exclusivesakal

सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे उजनी धरणाची पाणी पातळी आता झपाट्याने खालावू लागली आहे. ऊस, डाळिंब, केळी, द्राक्ष अशा पिकांना उजनीचा आधार आहे. तसेच अनेक उद्योग, शहरांचा पाणी पुरवठा देखील उजनीवर अवलंबून आहे. आता धरण पहिल्यांदाच मेच्या सुरवातीला मायनसमध्ये गेल्याने पाऊस लांबल्यास जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट ओढवू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक ३७ पेक्षा जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची राज्यभरात ओळख झाली आहे. उजनी धरणाच्या भरवशावर रब्बीच्या जिल्ह्यात खरिपाखाली क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात दोन लाख २० हजार हेक्टरवर ऊस आहे. दुसरीकडे ४७ हजार ३७७ हेक्टरवर डाळिंब, १६ हजार २० हेक्टरवर द्राक्ष, सात हजार ७१६ हेक्टरवर केळी आहे. सोलापूर जिल्ह्यातील केळी इराण, ओमान, दुबई, इराण, सौदी अरेबिया, नेपाळ या देशांमध्ये निर्यात होते. १ मे रोजी उजनीतील पाणीसाठा १.९४ टीएमसी (३.६३ टक्के) होता.

आता उजनीतील पाणीसाठा मायनस ६.५९ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. ३१ मेपर्यंत उजनीचा पाणीसाठा ३३ टक्क्यापर्यंत तर ३० जूनपर्यंत ३६ ते ३८ टक्क्यापर्यंत खाली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतीबरोबरच पिण्यासाठी देखील पाणी जपून वापरावे लागणार आहे.

माळशिरस तालुक्यात तीन टॅंकर

टॅंकरमुक्त जिल्हा म्हणून मागील आठ-दहा वर्षांपासून राज्यात ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ३ टॅंकर सुरु झाले आहेत. माळशिरस तालुक्यातील बचेरी, गारवाड व मगरवाडी या गावांना सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा आणखी एक महिना असल्याने मंगळवेढा, सांगोल्यासह इतर तालुक्यातून टॅंकरची मागणी येण्याची शक्यता आहे.

दहा वर्षांत पाचव्यांदा उजनी ३७ टक्क्यांखाली

  • - २०१२ ते २०२२ या ११ वर्षांत पाचव्यांदा उजनी धरण मायनस ३५ टक्क्यांखाली जाणार

  • - २०१९ मध्ये धरण मायनस ५९ टक्के, २०१६ मध्ये मायनस ५३ टक्के आणि २०१३ मध्ये मायनस ५० टक्के गेले होते.

  • - उजनीत २० टीएमसीपेक्षा अधिक गाळ असून सद्यस्थितीत धरणात ५७ टीएमसी मृतसाठा राहिला आहे.

  • - मायनस ४० टक्क्यांपर्यंत गेल्यावर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी करावे लागते दुबार पंपिंग

  • - धरण मायनसमध्ये गेल्याने आता कॅनॉलमधून पाणी नाहीच; सोलापूर शहरासाठी नदीतून जूनमध्ये सोडावे लागणार पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com