तेलतुंबडे यांना तात्पुरता दिलासा;12 फेब्रुवारीपर्यंत अटक टळली 

तेलतुंबडे यांना तात्पुरता दिलासा;12 फेब्रुवारीपर्यंत अटक टळली 

मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. 

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबई विमानतळावर अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात न्या. नितीन सांब्रे यांच्यापुढे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांना 11 फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही, अशी हमी पोलिसांनी न्यायालयात दिली. 

डॉ. तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने 12 फेब्रुवारीला ठेवली आहे. तोपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने त्यांना जामीन देण्यास विरोध केला आहे. तेलतुंबडे यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला असून, त्यांची अटकही कायद्यानुसार असल्याचेही न्यायालयात सांगितले. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेबाबत 21 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तेलतुंबडे यांचा उल्लेख "कॉम्रेड प्रकाश' यांची डायरी आणि लॅपटॉपवरील नोंदींमध्ये आहे. त्यांचे भाऊ मिलिंद तेलतुंबडे या प्रकरणात पोलिसांना हवे आहेत, असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com