पारनेर : ‘‘ठाकरे सरकार माफियांचे सरकार आहे. या सरकारचा जन्मच मूळात भ्रष्टाचार व माफियागिरीतून झाला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या केला. पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मी स्वतः लक्ष घालून कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’’ असेही ते म्हणाले.
पारनेर येथे पारनेर कारखान्याच्या विक्रीप्रकरणी सुरू झालेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) व पोलिस खात्याच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पारनेर कारखाना बचाव कृती समितीने सोमय्या यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या गुरुवारी पारनेरला आले होते. शेतकरी व कामगारहितासाठी कारखाना चालला पाहिजे. मात्र, त्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
परब, राऊत यांची लायकी काय?
‘‘माझ्यावर साडेपाचशे कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा लावतात व आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर मात्र सव्वा रुपयाचा दावा केला. या अनिल परब व संजय राऊत यांची लायकी काय,’’ असा घणाघातही भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.