राज्यातील या तीन जिल्ह्याधिकाऱ्यांनी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना विलगीकरणाची सक्ती करणारा काढला आदेश

ST
ST

मुंबई - राज्य सरकारने २० ऑगस्ट रोजी राज्यांतर्गत एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ई-पासविना प्रवास करण्याची मुभा आणि विलगीकरणाचे निर्बंध हटवण्यात आले होते; मात्र वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना विलगीकरणाची सक्ती करणारा आदेश काढला आहे. एसटी महामंडळाने याला विरोध केला असून हा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या आदेशाची पायमल्ली असल्याचे म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बस चालक आणि वाहकांनी प्रवासी बसमध्ये चढताना आणि उतरताना त्यांना विलगीकरणाची सूचना करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रवासीही या निर्णयाबाबत संभ्रमात आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशांनुसार प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यासंदर्भात कुठलेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेले विलगीकरण सक्तीचे आदेश राज्य शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणारे आहे.
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com