देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न होता - मुख्यमंत्री

देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न होता - मुख्यमंत्री

मुंबई - ‘‘कोरेगाव भीमाप्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. अशा लोकांना राजकीयदृष्ट्या समर्थन दिले जात असेल, तर आपण कोणाला समर्थन देत आहोत, याचा विचार केला गेला पाहिजे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस आज स्पष्ट केले. 

फडणवीस म्हणाले, ‘‘पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य, हा वादाचा विषय असू शकतो. त्या वेळी अनेकजण ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचा आरोप करत असल्याने पोलिसांनी पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले होते. मात्र, यामुळे देशाविरोधात कट रचला गेला, हा मुद्दा दुर्लक्षित करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे देशाच्या विरोधातील कट, वेगवेगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण करून, अंतर्गत वाद निर्माण व्हावा हा प्रयत्न उघड होत आहे. पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील.’’ नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई केलेले कवी वरवरा राव, ॲड. सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि नवलखा यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com