मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये पावसाने घेतले 30 बळी

Malad
Malad

मुंबई : मुंबई पुणे, नाशिकसह राज्यात पावसाचा कहर सुरुच असून, या शहरांमध्ये भिंती कोसळण्याच्या घडलेल्या घटनांमुळे तब्बल 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यभरात पाऊस होत असला तरी मुंबई आणि पुण्यात पावसाचा जोर आहे. त्यामुळे या दुर्घटना घडल्या आहेत.

मालाडमध्ये भिंत कोसळून 18 ठार
मालाड पूर्व येथील कुरार गावाजवळ सोमवारी मध्यरात्री सिमाभींत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बचावकार्य अद्याप सुरु असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे. वनखात्याची संरक्षण भिंत कोसळली. टेकडीवर बांधलेल्या काही झोपडपट्ट्यांवर ही भिंत कोसळली. एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

आंबेगावमध्ये सीमाभिंत पडून 6 मजुरांचा मृत्यू
पुण्यात पुन्हा एकदा सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर पडून सहा जण दगावल्याची घटना आंबेगाव परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत. कोंढवा परिसरात शनिवारी सिमाभींत पडून 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांत ही घटना घडली आहे.

कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू
कल्याणमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात नॅशनल उर्दू शाळेची सिमाभींत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून तिघांचा मृत्यू
नाशिकच्या सातपूर भागात बिल्डर सुजॉय गुप्ता यांच्या सुरू असलेल्या नवीन बांधकाम प्रकल्पाची पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली तर एक गंभीर जखमी आहे. मृतांत महंमद बारीक (वय 32 रा बिहार), बेबी सनबी खातून (वय 28 रा बिहार) दोघे मजूर आहेत, एका महिलेचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com