दुर्गम भागातील डॉक्‍टरांना न्याय कधी?

दुर्गम भागातील डॉक्‍टरांना न्याय कधी?

मुंबई - नक्षलग्रस्त भागासह १६ आदिवासी जिल्ह्यांत ४११ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गेल्या दहा वर्षांपासून ७३८ बीएएमएस डॉक्‍टर्स आपली सेवा बजावत आहेत. या डॉक्‍टरांना कायम करण्याचा निर्णय पंधरा महिने झाल्यानंतरही अमलात आलेला नाही. जर पुढील काही दिवसांत याची अंमलबजावणी झाली नाही तर लोकसभेची आचारसंहिता लागू शकते. यामुळे हा निर्णय रेंगाळू शकतो, याकडे लक्ष वेधले जात आहे.

गेली अनेक वर्षे या डॉक्‍टरांनी सेवेत कायम करावे, या मागणीसाठी आंदोलने केली होती. राज्यातल्या दुर्गम, डोंगराळ भागात एमबीबीएस डॉक्‍टर्स सेवा देण्यासाठी तयारी दर्शवत नसल्याने शासनाने बीएएमएस डॉक्‍टर्सना सेवा देण्याचे धोरण अवलंबिले होते. गेली दहा वर्षे या डॉक्‍टरांनी दिलेल्या संघर्षाला गेल्या वर्षी यश आले. मंत्रिमंडळात २९ ऑगस्ट २०१७ रोजी या सर्व डॉक्‍टरांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यास १५ महिने उलटले आहेत. मात्र, प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या राज्यातल्या ४११ आरोग्य केंद्रांवर हे डॉक्‍टर कार्यरत आहेत. त्यांना इतर ठिकाणी बदली ही दिली जात नाही. मात्र, शासनाने या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करण्याची कारवाई केल्यास सर्व सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

दरम्यान, या डॉक्‍टरांना नियमित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, लवकरच यासंदर्भातील अधिसूचना जारी होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com