हिवाळी अधिवेशन तारांकित प्रश्‍नाविना पार पडणार

Maharashtra-Vidhansabha
Maharashtra-Vidhansabha

अवधी कमी राहिल्याने सरकारकडून बगल; सरकार स्थापनेस विलंब झाल्याचा फटका
मुंबई - राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी महिनाभर सुरू असलेल्या घोळाचा फटका नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील कामकाजाला बसला आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांची सोडवणूक होण्यासाठी प्रत्येक आमदारांकडून हक्‍काने वापरले जाणारे तारांकित प्रश्‍नांच्या आयुधाविना नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पार पाडले जाणार आहे.

सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे मतमोजणी झाल्यानंतर महिना उलटला तरीही सरकार स्थापन झाले नाही. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र अत्यंत कमी कालावधी शिल्लक राहिल्यामुळे हे अधिवेशन १६ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर असे पाच दिवस घेण्याचे निश्‍चित झाले आहे. तारांकित प्रश्‍न, अशासकीय प्रस्ताव सदस्याकडून किमान ३० ते ४० दिवस अगोदर ऑनलाइन दाखल करावे लागतात.

विधान परिषदेतील सदस्य हे किमान ४० दिवस अगोदर तर विधानसभेतील सदस्य किमान ३० दिवस अगोदर तारांकित प्रश्‍न, अशासकीय ठराव ऑनलाइन पद्धतीने दाखल करू शकतात. मात्र फार कमी दिवसांचा कालावधी शिल्लक उरल्याने तारांकित प्रश्‍न, अशासकीय ठराव या आयुधांना बगल देण्यात आली आहे. तारांकित प्रश्‍न, अशासकीय ठराव न घेता कामकाज होणार आहे. उरलेले कामही घाईघाईने उरकले जाणार आहे. केवळ पाच दिवसांच्या कालावधीत महाविकास आघाडीचे पहिले हिवाळी अधिवेशन पार पाडले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com