पुणे/नवी दिल्ली- यूपी आणि बिहार म्हणजे देशातील गुन्हेगारीची प्रमुख राज्ये असल्याची चर्चा आपण चवीने करतो. मात्र, केंद्रीय गुन्हे नोंदणी मंडळाने नुकतीच प्रसिद्ध केलेली आकडेवारी धक्कादायक व महाराष्ट्रासाठी डोळे उघडणारी आहे.
देशातील महिलांवर 2015 मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या एकूण घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे 13 टक्के गुन्हे महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ मध्यप्रदेशात 9.9, तर उत्तर प्रदेशात 8.7 टक्के एवढे महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात महिलांचा विनयभंग करण्यात आल्याच्या 11 हजार 713 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच, भारतीय दंडविधानाच्या कलमांनुसार महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे 16 हजार 989 गुन्हे झाले.
महाराष्ट्रात 2014 मध्ये बलात्काराचे 3438 गुन्हे दाखल झाले होते. तसेच, 2013 मध्ये महिलांविरोधात महाराष्ट्रात एकूण 24 हजार 895 गुन्ह्यांची नोंद झाली होती.
महत्वाच्या शहरातील दखलपात्र गुन्हे
दिल्ली- 1,73,947
अहमदाबाद- 15964
पुणे- 15349
मुंबई- 42940
नागपूर- 11018
औरंगाबाद- 7051
चेन्नई- 13422
बंगळूर- 35576
भोपाळ- 14857
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.