मुंबई - राज्य सरकारचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार गुरुवारी जाहीर झाले. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. जयसिंगराव पवार, रामदास भटकळ, इरावती कर्णिक, कृष्णात खोत, मृदला बेळे यांच्यासह 32 लेखकांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 50 हजार ते एक लाख रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार देण्यात येतील. प्रौढ वाङ्मय पुरस्काराची रक्कम एक लाख; तर प्रथम प्रकाशनासाठी पुरस्काराची रक्कम 50 हजार रुपये आहे. हे पुरस्कार 35 वाङ्मय प्रकारांसाठी देण्यात येतात; मात्र यंदा तीन पुरस्कारांसाठी शिफारस आलेली नाही.
पुरस्कारांचे मानकरी
- कवी केशवसुत पुरस्कार : शशिकांत हिंगोणेकर (ऋतुपर्व)
- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : अमृता तेलंग (पुन्हा फुटतो भादवा)
- राम गणेश गडकरी पुरस्कार : आशुतोष पोतदार (एफ/105 आणि सिंधू सुधाकर, रम आणि इतर)
- अनंत काणेकर पुरस्कार : इरावती कर्णिक (बाटलीतल्या राक्षसिणीचे मनोगत)
- ताराबाई शिंदे पुरस्कार : सुधीर महाबळ (परतवारी)
- महात्मा जोतिबा फुले पुरस्कार : डॉ. जयंत नारळीकर (गणित आणि विज्ञान युगायुगाची जुगलबंदी)
- शाहू महाराज पुरस्कार : डॉ. जयसिंगराव पवार (शिवपुत्र छत्रपती राजाराम)
- हरी नारायण आपटे पुरस्कार : कृष्णात खोत (रिंगण)
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार : रामदास भटकळ (इंडियन होमरूल हिंद स्वराज)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : ऍड. निशा शिवूरकर (लढा टाकलेल्या स्त्रियांचा)
|