Ajay devgn
Ajay devgnesakal

एकाची चूक अख्ख्या बॉलीवूडला लोकं देतात शिव्या, अजय कुणावर भडकला?

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण (Bollywood Ajay Devgn) हा आता भलताच चर्चेत आला आहे.

Entertainment News: बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण (Bollywood Ajay Devgn) हा आता भलताच चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याचा रन वे 34 नावाचा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं तो त्याच्या (Bollywood News) प्रदर्शनाच्या गडबडीत आहे. काही दिवसांपासून बॉलीवूड हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. टॉलीवूडमधील चित्रपटांचा वाढता टक्का, (Bollywood Actor) बॉलीवूड चित्रपटांना तुलनेनं मिळणारा कमी प्रतिसाद याचा फटका हिंदी बॉक्स ऑफिसवर झाला आहे. प्रेक्षकांना कोरोनानंतर दाक्षिणात्य चित्रपट आवडू लागले आहेत. त्यातील थरार, नाविन्यता, दिग्दर्शकाची प्रभावी मांडणी आणि संगीत यामुळे टॉलीवूडच्या प्रेक्षकांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. दुसरीकडे बॉलीवूडमधील अभिनेते हे त्यांना मिळणाऱ्या जाहिरातीमुळे चर्चेत आले आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. सध्याच्या घडीला तो बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी असा निर्माता आणि अभिनेता आहे. मात्र त्याला सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले. त्याचे कारण त्यानं केलेली विमल पानमसाल्याची जाहिरात. याचा परिणाम त्याच्या प्रसिद्धीवर झाल्याचे दिसून आले आहे. जेव्हा अक्षय पानमसाल्याची जाहिरात करतो आहे असे त्याच्या कळले तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले, वास्तविक ती जाहिरात ही यापूर्वी अजय देवगण आणि शाहरुख खान यांनी देखील केली होती. आता त्यावरुन अजयनं प्रतिक्रिया दिली आहे. एकाची चूक मात्र त्याची शिक्षा सगळ्यांना होते. सगळेजण शिव्या खातात. 29 एप्रिलला अजय देवगणचा रन वे नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Ajay devgn
Bhool Bhulaiyaa 2 Trailer: मंजुलिका परत आलीय!

एका मुलाखतीमध्ये अजयनं सध्याच्या बॉलीवूडच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यात तो म्हणतो, एखादा सेलिब्रेटी जेव्हा त्याच्या मनातील काही गोष्टी बोलतो तेव्हा त्याच्याकडे पाहून अनेकजण त्याला दोषी ठरवतात. त्या एका सेलिब्रेटीचं मतं हे काही सगळ्यांचं मत असू शकत नाही. आतापर्यतचा प्रवास करताना तुला कोणत्या गोष्टींची सर्वाधिक काळजी घ्यावी लागली होती. असा प्रश्न अजयला विचारण्य़ात आला होता. त्यावर त्यानं आपल्याला नेहमीच वजन वाढू नये याची काळजी घ्यावी लागली. दुसरी गोष्ट म्हणजे, कित्येकवेळा एखादी गोष्ट खुलेपणानं बोलण्याची इच्छा असूनही ती कधीही बोलला न येणं याचे भान ठेवावे लागते. असे अजय म्हणाला.

Ajay devgn
Teaser: सम्या- रेणूची मनाला भिडणारी प्रेमकहाणी ‘समरेणू’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com