सलमान खानच्या(Salman Khan) 'बजरंगी भाईजान' सिनेमानं अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं होतं. सिनेमाच्या कथानकातच दम होता. के.वी.विजयेंद्र प्रसाद यांनी भारत-पाकिस्तान केंद्रस्थानी ठेवून त्यात नात्याची एक सुंदर गुंफण अशा पद्दतीनं केली होती की केवळ भारतीय नाही तर पाकिस्तानी लोकांनीही सिनेमाला डोक्यावर उचलून धरलं होतं. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमाचा सीक्वेल येणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. या चर्चांना पूर्ण विराम तेव्हा लागला जेव्हा सलमाननं सीक्वेल येणार असं सांगितलं. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यानं सिनेमाचं नाव 'पवनपुत्र भाईजान' असेल असंही लगोलग सांगून टाकलं होतं.