मुंबई- ज्येष्ठ गीतकार अभिलाष यांचं निधन झालं आहे. रविवारी रात्री त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अभिलाष यांना कॅन्सर होता. त्यांच्या महत्वाच्या गाण्यांमध्ये 'इतनी शक्ती हमे देना दाता', 'संसार है एक नदीया' आणि 'आज की रात ना जा' यांसोबत अनेक गाण्यांचा समावेश आहे. अभिलाष यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
अभिलाष यांना यकृताचा कॅन्सर होता. ते गेल्या १० महिन्यांपासून बेडरिडन होते. त्यांचं एक ऑपरेशन देखील झालं होतं. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. गेल्या काही दिवसांमध्ये अभिलाष यांच्या पत्नीने आर्थिक मदत मागितली होती. अभिलाष यांच्या करिअरसाठी 'अंकुश' सिनेमातील 'इतनी शक्ती हमे देना दाता' हे गाणं टर्निंग पॉईंट ठरलं. हे गाणं लिहिण्यासाठी त्यांना दोन महिने लागले होते. याव्यतिरिक्त त्यांना त्यांनी 'रफ्तार' या सिनेमासाठी लिहिलेलं 'संसार एक नदिया' हे गाणं देखील खुप आवडत होतं.
अभिलाष म्हणायचे की हे गाणं लिहिल्यानंतर त्यांना आत्मिक समाधान मिळालं होतं. सिनेमांसाठी गाणी लिहिण्याव्यतिरिक्त अभिलाष रेडिओसाठी देखील गाणी लिहायचे. अभिलाष यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत शोकाकुल वातावरण आहे. सोशल मिडियावर सेलिब्रिटींसोबतंच त्यांचे चाहते देखील त्यांच्या आठवणीत त्यांना श्रद्धांजली देत आहेत.
lyrics writer abhilash passed away
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.