Bollywood News: बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सध्या ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्याला कारणही तसेच आहे. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ती प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या पचनी न पडल्यानं त्यांना ट्रोल व्हावे लागले आहे. सोशल मीडियावर (Viral On Social Media) जावेद अख्तर यांची ती प्रतिक्रिया आणि नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट या व्हायरल झाल्या आहे. अख्तर काय म्हणाले आपण जाणून घेणार आहोत. subhash chandra statue india gate bollywood javed akhtar reacts
या वक्तव्यावरुन अख्तर यांना ट्रोल व्हावे लागले आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका सुरु केली आहे. आपण आपलं ज्ञान आपल्याजवळच ठेवावं. अशा शब्दांत त्यांनी अख्तर यांना सुनावलं आहे. त्यामुळे अख्तर चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अख्तर हे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत येताना दिसत आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना आणि अख्तर यांच्यातील वाद काही दिवसांपासून चर्चेत आहे.
दिल्लीतील इंडिया गेटवर (India Gate) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे. त्यावरुन अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या मुर्तीची निर्मिती प्रसिद्ध मुर्तीकार अव्दैत गडनायक यांनी केली आहे. सध्या त्या मुर्तीची जोरदार चर्चा सुरु आहे. यासगळ्या प्रकरणावर अख्तर यांनी प्रतिक्रिया देताना नेहमीप्रमाणे वेगळा सूर आळवला आहे. ज्याची चर्चा सुरु झाली आहे. अख्तर यांचे म्हणणे आहे की, नेताजी यांचे शिल्प लावण्याचा विचार गैर नाही. मात्र ज्यापद्धतीनं लावण्यात आले आहे ते चूकीचे आहे. त्याची पोझिशन चुकली आहे. असं अख्तर म्हणाले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.